आपला जिल्हा
नांदेड शहरातील गुरुकर्मवीर नगर पिण्याच्या पाण्या पासून वंचित
नांदेड दि : प्रतिनिधी नमस्कार चौक लगत असलेल्या गुरुकर्मवीर नगर मध्ये मागील एक महिन्यापासून कमी दाबाने पिण्याचे पाणी येत त्यातही खूप कमी वेळ हे पाणी सोडले जात असल्यामुळे नगरवासी यांचे पुरते हाल झाले आहेत येथील नागरिकांनी वेळोवेळी महापालिकेच्या निदर्शनास आणून देखील महानगरपालिका याकडे मात्र कानाडोळा करताना दिसत आहे पाणी सुरळीत सोडण्याची मागणी नागरिक मोठ्या प्रमाणात करत आहेत प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन नगरवासीयांसाठी पिण्याचे पाणी सुरळीत सोडावे ही अशी मागणी केली आहे पाणी सुरळीत न सोडल्यास प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे