एम सी आर
Uncategorized

माजी सरपंच के. विठ्ठलराव बाबाराव पाटील वानखेडे यांचे निधन

बेतसांगवी (कपिलेश्वर), दि. ७ ऑगस्ट : बेतसांगवी (कपिलेश्वर) येथील माजी सरपंच के. विठ्ठलराव बाबाराव पाटील वानखेडे यांचे गुरुवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

स्वर्गीय विठ्ठलराव वानखेडे यांनी सरपंच म्हणून कार्यरत असताना गावाच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या शांत, संयमी आणि समाजाभिमुख स्वभावामुळे ते ग्रामस्थांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील एक अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

त्यांच्यावर शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता बेतसांगवी (कपिलेश्वर) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात कुटुंबीयांसह मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत असून ग्रामस्थांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Share

Related posts

राष्ट्रीय सेवा योजनेतून युवकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधता येतो- प्रा.दिलीपकुमार मटके

Chief Editor

कै सौ कमलताई जामकर महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रमाचे आयोजन 

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठातील चंपत हंबर्डे यांचे निधन; विद्यापीठात श्रद्धांजली सभा

Chief Editor

यशवंत वार्षिक युवक महोत्सवाचे उत्साह आणि थाटात उद्घाटन संपन्न

Chief Editor

नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला; उष्माघातापासून वाचण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

Chief Editor

विचारांची आणि मनाची स्वातंत्रता हीच खरी लोकशाही- प्रा डॉ सुधीर गव्हाणे

Chief Editor

Leave a Comment