ताज्या बातम्या
ग्रामीण भागातील सौरदिवे बनले सोभेची वस्तू
ग्राम पंचायतीच्या प्रभागातील सौरदिवे मोजतात अखेरची घटका }

मानवत / प्रतिनिधी ग्रामीण भागात विजेचे वाढते भारनियमन यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागते ही गरज लक्षात घेता शासनाने सामाजिक न्याय विभाग अंतर्गत मानवत तालुक्यातील ग्रामिण भागातील अनेक खेडी गावे वस्ती तांडे यावर विशेष निधी खर्च करून संबंधित ग्राम पंचायत अंतर्गत सौर दिवे उपलब्ध करून देण्यात आले.
परंतु अनेक ग्रामीण भागातील बसविण्यात आलेल्या दिव्याचे विदयुत संच गायब झाले आहेत तर काही ठिकाणी स्ट्रिट लाईट खराब झाले आहेत तर काही ठिकाणी या विद्युत संचाची देखभाल दुरुस्ती केली नसल्यमुळे केवळ विद्युत खांब उभे आहेत.
या मुळे सौर दिवे म्हणजे केवळ सोभेची वस्तू बनली असून , सौर दिवे मोजत आहे अखेरची घटका याकडे संबंधित ग्राम पंचायतने लक्ष देण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे.
***