ताज्या घडामोडी

डाॅ. अकूंशराव लाड यांच्या प्रयत्नामूळे संत सावता माळी मंदिर परिसरातील नागरिकांचा प्रलंबित प्रश्न मार्गी

नागरिकातून समाधान व्यक्त केल्या जात आहे.

मानवत / प्रतिनिधी.

पावसाचे पाणी घरात जात असल्याने या परिसरातील नागरिक होते. तर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने नालीचे बांधकाम हाती घेतल्याने संत सावता महाराज मंदीर परिसरातील प्रश्न डाॅ. अकूंशराव लाड यांच्या प्रयत्नामूळे कायमचा निकाली काढण्यात आल्यामूळे संत सावता महाराज मंदीर परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त केल्या जात आहे.
येथील संत सावता माळी मंदिर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी फार मोठ्या प्रमाणात जात होते तसेच पाणी रस्त्यावर साचत होते. हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बाजूने राहणाऱ्या नागरिकांनी लावून धरला होता . याच मागणीचा विचार मानवत शहराचे युवानेते डॉ. अंकुश लाड यांनी केला. शासन दरबारी यासाठी निधी मिळविणे करीता पाठपुरावा केला . या कामासाठी निधी खेचून आणला ६ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी१० वाजता या नाली कामाचे उद्घाटन डॉ.अंकुश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. संत सावता माळी कमान ते राष्ट्रीय महामार्ग ६१ हा साधारणतः ८०० ते ९०० मीटर असलेला रस्ता या रस्त्याच्या दुतर्फा बाजूला बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोक वस्ती झाली आहे. या वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सातत्याने पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्यावर पावसाच्या असो की नागरिकांचे सांडपाण्याचे दोन्ही पाणी रस्त्यावर साचत असल्याने रस्त्याची देखील दुरावस्था होत होती. म्हणून या रस्त्याच्या दुतर्फा बाजूला मोठी नाली बांधून राष्ट्रीय महामार्ग ते संत सावतामाळी कमान या दरम्यान नाली झाल्यास रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे पाणी येणार नाही परिणामी ते पाणी नागरिकांच्या घरात जाणार नाही यामुळे या परिसरातील नागरीक वारंवार डॉ. अंकुशराव लाड यांच्या संपर्कात होते. नाली नसल्यामुळे होणाऱ्या त्रासाची कल्पना त्यांनी डॉ. अकूॅशराव लाड यांना दिली. या मागणीचा गांभीर्याने विचार करत डॉ. अकूंशराव लाड यांनी शासनाकडून या कामासाठी निधी खेचून आणला ६ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या नाली कामाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी डॉ अंकुशराव लाड यांनी या कामाचे उद्घाटन केले तर प्रभागाचे नगरसेवक गिरीशशेठ कत्रुवर , दत्ताभाऊ चौधरी ,गणेश कुमावत ,संत सावता माळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कोक्कर , बळीराम रासवे , इंजिनीयर बबन राऊत साहेब , ज्ञानेश्वर रासवे, नारायण रासवे , भिकाजी रासवे ,नामदेव कोकर , व्यंकटेश चौधरी ,श्रीधर कोकर , उद्धव रासवे सर,वसंत मोरे, गणपत सिसोदे, डॉक्टर विजय कहेकर ,श्री मुंजाभाऊ राऊत, प्रा. गजानन रासवे,दिगांबर मगर साहेब, देवा भरड, सुनील रासवे, कृष्णा रासवे, महेश वाघमारे, बालाजी रासवे ,मधुकर रासवे, मनोहर राऊत, श्री सोपान वाघमारे, गणेश वाघमारे , आकाश राऊत, ओम राऊत ,गणेश गोरे ,अमोल चौधरी ,कृष्णा रासवे, पप्पू डाके, हनुमान चौके शिवाजी शेंडगे व संत सावता माळी मंदीर परिसरातील रहिवासी उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी मानवत नगरीचे विकास पूरूष डॉ. अकूंशराव लाड गिरीश कत्रूवार दत्ताभाऊ चौधरी गणेश कुमावत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव रासवे यांनी केले तर उपस्थित प्रभागातील नागरिक व मान्यवरांचे आभार माजी नगर सेवक दत्ताभाऊ चौधरी यांनी मानले.
संत सावता माळी रोडवरील नालीच्या व शेतातील साचलेल्या घाण पाण्या मुळे आमच्या सर्व नागरिकांच्या आरोग्याचा तर प्रश्न निर्माण झालाच होता पण आमच्या परिसरातील जमीन काळीचे असल्यामुळे आमच्या बिल्डिंग पडण्याची सुद्धा भीती वाटत होती आमची ही समस्या डॉ. अंकुशराव लाड यांना भेटून कानावर घातली हो त्यांनी तात्काळ हा आमचा नालीचा प्रश्न मार्गी लावला त्याबद्दल डॉ. अकूंशराव लाड यांचे या प्रसंगी इंजिनीयर बबन राऊत यांनी आभार व्यक्त केले.

*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.