ताज्या घडामोडी

नगर परिषद मानवतच्या वतीने *हर घर तिरंगा* अभियानात नागरीकांनी सहभागी व्हा :मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे.

मानवत / प्रतिनिधी.

दिनांक 09 ऑगस्ट रोजी मानवत नगर परिषद यांच्या वतीने मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांच्या मार्गदर्शनाखाले *हर घर तिरंगा* अभियान राबविण्यास प्रारंभ करण्यात आला असून यामुळे पहिला कार्यक्रम मानवत नगर परिषद व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मानवत शहरांमध्ये भव्य *तिरंगा* रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण शहरामध्ये *हर घर तिरंगा* अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. या काळा दरम्यान नगर परिषदेच्या वतीने शहरा मध्ये वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत यामध्ये तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा ट्रीब्युट, तिरंगा मेला तिरंगा सेल्फी त्याच बरोबर अशा अनेक विविध सांस्कृतीक कार्यक्रमाच्या माध्यमातून अभियान राबविण्यात येत आहे.
या अनुषंगाने मानवत शहरांमध्ये मानवत नगर परिषद यांच्या वतीने हर घर तिरंगा अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील तिरंगा रॅली ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मानवत नगर परिषद कार्यालय अशी काढण्यात आली. या रॅलीमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय यांचे विद्यार्थी व शिक्षक वृंद मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी काढण्यात आलेल्या *तिरंगा* रॅलीमध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने देशभक्तीपर घोषणाबाजी व गीत गायन करण्यात आले. यामुळे शहरांमध्ये देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. मानवत शहरातील नागरिकांनी जागोजागी या रॅलीचे स्वागत केले. रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांसाठी व शिक्षक वृंद तसेच इतर कर्मचाऱ्यांसाठी दूध,बिस्किट, चहापाणी यांची व्यवस्था नगर परिषद मानवत च्या वतीने करण्यात आली होती.
या रॅलीच्या माध्यमातून मानवत नगरपरिषद कार्यालयाच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट अशा एकूण तीन दिवस प्रत्येक नागरिकांनी आप आपल्या घरावरती, दुकाने, आस्थापना, याचबरोबर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय इत्यादी ठिकाणी तिरंगा झेंडा लावावा असे आवाहन करण्यात मानवत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी या वेळी केले. याचबरोबर शहरांमध्ये असे विविध संस्कृती पर कार्यक्रम नगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहेत व याच पुढेही उत्स्फूर्तपणे राबविण्यात येतील व शहरातील सर्व नागरिकांनी स्वच्छतेबाबतीत जागरूकता दर्शवावी आपले घर- परिसर अंगण स्वच्छ ठेवावे,व तसेच शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास मदत करावी हा पण देशसेवेचाच एक भाग आहे असे श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद मानवत यांनी सांगितले.
या रॅलीमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थी तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एम.बी. जोशी, पाटील एस एस, वाकळे एस डी, नाईक एस एस, मठवाले एस जी, पुरंगळ के,जी आदीसह शिक्षक वृंद यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदविला.
तसेच मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे मानवत नगर परिषदेचे कर्मचारी अभियंता श्री सय्यद अन्वर,कार्यलीयन अधीक्षक श्री भगवान शिंदे, आर.बी. चव्हाण, भारत पवार,मुंजासा खोडवे, महेश कदम,एस.बी उन्हाळे, हनुमंत बिडवे,श्री.रवी दहे,दिपक सातभाई, संतोष खरात,राजेश शर्मा, मनमोहन बारहाते,नारायण व्यवहारे, भगवानराव बारटक्के,एस.एन,रुद्रवार, पंकज पवार, विनय आडसकर, शतानिक जोशी, मुंजाभाऊ गवारे,एस.एस काळे, नारायण काळे, मुंजाजी डोळसे, सचिन सोनवणे,यशपाल भदर्गे, रितेश भदर्गे, शेख वसीम,सय्यद जावेद,सुनील कीर्तने,संजय कुऱ्हाडे,दीपक भदर्गे, बाळू लाड,बळीराम दहे,अलीम अन्सारी, संजय कुऱ्हाडे, श्रीमती वंदना इंगोले श्रीमती शितल सोळंके, श्रीमती सुनिता वाडकर, श्रीमती सीमा कंची, भारती भदर्गे, तसेच स्वच्छता विभागातील कर्मचारी या वेळी मोठ्या संख्येने *तिरंगा रॅली* मध्ये उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.