ताज्या घडामोडी

धोकादायक विद्यूत खांब नागरिकांच्या सूचना मिळताच हटविला ; नागरिकांतून समाधान

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील पेठ मोहल्ला मरकज मस्जिद परिसरामधील जीर्ण विद्युत खांब सध्याच्या वादळ वाऱ्याने कोसळुन जीवित हानी होण्याची शक्यता होती.
ही बाब समाजसेवक अब्दुल वहाब बागवान यांनी महावितरणचे शेख शफीक यांना फोन द्वारे सांगितले व त्यानंतर तात्काळ खबरदारी घेत स्वतः महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी येऊन त्याची पाहणी केली. महावितरणचे सहाय्यक अभियंता सुधाकर गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली
जीर्णविद्युत खांब युद्धपातळीवर काम करून ते दिनांक ३० जुलै रोजी बदलण्यात आले.
यावेळी शेख शफी, दिगंबर गव्हाणे, शिवाजी होंडे,संतोष लोखंडे,निमदेव पराड,दिपक सोरेकर,विशाल जाधव यांच्या सह यावेळी परिसरातील नागरीक उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.