करियर घडविण्यामध्ये राज्यशास्त्र केंद्रस्थानी – डॉ.आर.डी.शिंदे
नांदेड:(दि.५ ऑगस्ट २०२३)
विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यामध्ये राज्यशास्त्र केंद्रस्थानी आहे. राज्यशास्त्र हा विषय सकारात्मक व विधायक कार्य करण्यास प्रवृत्त करतो. अणुबॉम्बचा वापर कुठे आणि कसा करावा; याचा अंतिम निर्णय राज्यकर्त्यांच्या म्हणजेच राज्यशास्त्राच्या हातात असतो; असे प्रतिपादन लोकमान्य महाविद्यालय, सोनखेड येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.आर.डी.शिंदे यांनी केले.
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलीत यशवंत महाविद्यालयात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित इंडक्शन कार्यक्रमांतर्गत ‘राज्यशास्त्रातील करियर आणि संधी’ या विषयावर दि.५ ऑगस्ट रोजी ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे आणि डॉ.वीरभद्र स्वामी यांची उपस्थिती होती.
अध्यक्षिय समारोपात उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी संविधानवादी असावयास हवे. भारतीय संविधानातील मूल्यांना जपण्याचा आटोकाट प्रयत्न करायला हवा. विद्यमान भारतीय संविधान टिकले तरच देशाला भवितव्य आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय गव्हाणे यांनी केले तर आभार कु. शेख तबसूम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ.साईनाथ बिंदगे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डी .यु.मोरे,आनंदा शिंदे, जगदीश उमरीकर,नाना शिंदे, संविधान कांबळे, योगेश केकाटे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती होती.
——————————————-