एम सी आर
Uncategorized

जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त स्व-गणना करावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड दि. 28 एप्रिल :- भारताची जनगणना-2027 ही पहिली डिजिटल जनगणना लवकरच सुरू होणार आहे. जिल्ह्यातील सर्व नगारिकांनी येत्या 1 ते 15 मे पर्यंत स्व-गणना करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. जिल्ह्यातील प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी, एनएसएस व एनसीसीचे समुपदेशक यांची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

स्व-गणनेची माहिती se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर 1 ते 15 मे 2026 पर्यंत भरता येईल. नोंदणी केलेली संपूर्ण माहिती ही गोपनीय राहणार असून स्व-गणनेत नांदेड जिल्हा प्रथम येईल, अशा पद्धतीने सर्वांनी स्व-गणनेचे नियोजन करुन जास्तीत जास्त स्वगणना करावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
0000

Share

Related posts

यशवंत ‘ मधील डॉ.मीरा फड यांची राज्यस्तरीय निवड

Chief Editor

नांदेडमध्ये घरफोडी प्रकरणाचा छडा तीन आरोपी अटकेत • रोख रक्कम जप्त

Chief Editor

हिंद दी चादर’ या भव्य समागमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी दोन दिवस उल्लेखनीय सेवाकार्य केले.

Chief Editor

मितभाषी, संयमी व भाषिक अहिंसामय: डॉ.अशोक सिद्धेवाड (लेखक:डॉ. अजय गव्हाणे)

Chief Editor

आरआरसी प्रस्ताव सादर करण्याची मुदत वाढविण्याची: डॉ. महेश मगर यांची मागणी

Chief Editor

_विद्रोही साहित्य संमेलनात प्रख्यात सिने अभिनेते मिलिंद शिंदे यांची मुलाखत ठरली लक्षवेधी

Chief Editor

Leave a Comment