नांदेड:
बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिंतूर येथून दि.१५ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू करण्यात आलेली “बंजारा समाज जोडो यात्रा” दि. ८ मार्च २०२६ रोजी नांदेड शहरात दाखल झाली.या यात्रेचे प्रमुख संघर्ष योद्धा विनोद आडे यांच्या नेतृत्वाखाली यात्रा पुढे सुरू असून नांदेड जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांच्या वतीने यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.या यात्रेत राजूसिंघ जाधव, अॅड.सुभाष जाधव,अॅड.अंकुश बर्डे, पंढरी आडे,अॅड.पी.एम.चव्हाण आदी समाज बांधव सहभागी झाले आहेत. समाजाच्या हक्काच्या मागण्यांसाठी ही यात्रा काढण्यात आली असून समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
दरम्यान,दि.८ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर “एकच मिशन – एसटी आरक्षण” या घोषवाक्याखाली मोठा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.या मेळाव्यास जास्तीत जास्त बंजारा समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राजूसिंघ जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
