व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांनी सप्तसुत्रांचा अवलंब करावा :- श्री भालचंद्र
नांदेड:
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील व्यक्तिमत्व विकास समितीच्या वतीने
युथ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर अभया फाउंडेशन हैदराबाद चे प्रमुख श्री बालचंद्र यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी बोलत असताना श्री भालचंद्र यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाची सप्तसूत्री सांगितली
त्यांच्या मते विद्यार्थिनी नेहमी स्वतःच्या लक्ष प्राप्तीसाठी
1) दक्ष असावा 2) प्रामाणिक प्रयत्न करावे 3) स्वतःच्या कामात अद्वितीय असावे 4) विद्यार्थ्यांचा निर्धार पक्का असावा 5) आलेले संकट आणि समस्यांना पुढे जाण्यासाठी सदैव तयार असावा 6) कष्ट आणि मेहनत करण्यासाठी लाज बाळगू नये 7) लक्ष प्राप्त होईपर्यंत प्रयत्न सदैव चालू ठेवावे
या सप्तसुत्रींचा अवलंब केला असता विद्यार्थ्यांना नेहमी यश मिळेल याबरोबर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास देखील होईल असे मत त्यांनी व्यक्त केले याप्रसंगी महाविद्याचे प्राचार्य गणेशचंद्र शिंदे सर,महाविद्यालयाचे उप्राचार्य डॉ . हरिश्चंद्र पतंगे , उपप्राचार्य प्रो.डॉ.कविता सोनकांबळे मॅडम
व्यक्तिमत्व विकास समितीचे समन्वयक डॉ. डी.डी.भोसले, प्रा.मीरा फड मॅडम . याचबरोबर प्रथम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे रजिस्टर संदीप पाटील सर याचबरोबर प्राध्यापक अजय गव्हाणे सर यांनी प्रयत्न केले
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डी.डी.भोसले यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली