https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संत शिरोमणी गूरू रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.

मानवत // प्रतिनिधी.

मानवत येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आज दिनांक १७ मार्च रोजी मानवत येथे श्री संत शिरोमणी गूरू रविदास महाराज, कुळवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराज, कक्कया महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सकाळी दहा वाजता मानवत शहरातील मुख्य मार्गाने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणू काढण्यात आली या वेळी हजारो समाज बांधव उपस्थित होते. यावेळी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व भारत मातेचा सजीव देखावा सादर करण्यात आला. या शोभा यात्रे निमित्त रामजन्मोत्सव समिती यांच्या वतीने अल्पोपहार वाटप करण्यात आला. तर
मिरवणुकीचा समारोप जिजाऊ नगर येथील संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिर नियोजित जागेवर करण्यात आला,
यावेळी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अंकुशराव लाड हे होते ,तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक माणिकराव चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी सेवानिवृत्त प्राध्यापक एस एन पाटील, गणेश कुमावत , विनोद रहाटे , नरहरी सोनवणे, रामकिशन कांबळे , पंढरीनाथ धोंगडे, जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे, विनोद असोरे, सुग्रीव ठोंबरे, अंबादास घायाळ यांची प्रमूख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी गूरू रविदास महाराज , छत्रपती शिवाजी महाराज, कक्कया महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्या नंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, यावेळी प्रमुख व्याख्याते प्राध्यापक माणिकराव चव्हाण, यांनी संत शिरोमणी गूरू रविदास महाराज यांच्या जिवन चरित्र्यावर प्रकाश टाकल. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, डॉ. अंकुशराव लाड यांनी उपस्थित समाज बांधवांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्र संचालन एम.जी शेवाळे यांनी तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मुरलीधर ठोंबरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पानझाडे , रमेश केंदळे, शिवाजी ठोंबरे, ओमकार वाघमारे, भागवत कांबळे, केशव पवार, शंकर हंकारे, यांच्यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले

🙏🙏

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704