मानवत तालूक्यातील पोहंडूळ येथे गायरानधारक यांची महत्वाची नियोजन बैठक संपन्न
मानवत / प्रतिनिधी.
परभणी जिल्ह्यासह मानवत तालूक्यातील प्रलंबित असलेल्या गायराण जमीनी ताब्यात असलेल्या आणि गायरान जमिनी कसणार्यांच्या नावे करा या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील गायरानधारक यांची महत्व पूर्ण बैठक दिनांक ०६ फेब्रुवारी मंगळवार रोजी सेलु येथे बैठक आयोजित केली आहे.
त्या अनुषंगाने मानवत तालुक्यातील मौ. पोहंडूळ येथे त्या संदर्भातील महत्वाची नियोजन बैठक पार पडली. परभणी जिल्हासह मानवत तालूक्यात गेल्या अनेक वर्षा पासून गायरानधारक कसत असलेल्या गायरानधारक यांच्या जमिनी या सन – १९९० पूर्वी पासूनच कसत असून ज्या गायरान धारकांकडे पुरावे आहेत ते पुरावे प्रशासनाकडे सादर करून ही जमिनी नावे करण्यात येत नाहीत.
यासाठी पुढील दिशा ठरवण्या करीता सेलू येथे महत्व पूर्ण बैठक आयोजित केली असून या बैठकीस मानवत तालुक्यातील गायरान जमीनधारकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन या नियोजन बैठकी दरम्यान महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉ. आसाराम बुरखुंडे, कॉ. रामराजे महाडिक, जिल्हा उपाध्यक्ष कॉ. लिंबाजी धनले, कॉ मारुती सुर्यवंशी यांनी केले. यावेळी नियोजन बैठकिस, व्यंकट तुपसमुद्रे, सखाराम जाधव, आश्रोबा वाकळे, पार्वती जाधव, मायावती सुर्यवंशी, सतुबाई तुपसमुद्रे, पारुबाई वाकळे, पारुबाई कांबळे यांच्या सह मोठया संख्येने गायरान धारक या वेळी उपस्थित होते.
***