“
“आज नांदेडमध्ये जमलेला हा जनसमुदाय पाहून शहीद पोचराम कांबळे यांच्या बलिदानाची आठवण होते. एवढ्या मोठ्या संख्येने समाजबांधव एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवत आहेत, याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ सर्व घटकांना समान प्रमाणात मिळणे आवश्यक आहे. मात्र, अनेक जाती आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. त्यांच्या शिक्षण, रोजगार आणि सामाजिक प्रगतीच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. हा संघर्ष कोणत्याही एका समाजाच्या विरोधात नसून वंचित घटकांच्या न्याय्य हक्कासाठी आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन संविधानिक मार्गाने आपला आवाज बुलंद करणे आवश्यक आहे. आज नांदेडमध्ये दिसलेली एकजूट ही भविष्यातील निर्णायक लढ्याची ताकद आहे.”
— लक्ष्मण ढोबळे, माजी मंत्री
