एम सी आर
Uncategorized

डोळस व सक्षम नागरिक होण्यासाठी राज्यशास्त्र आवश्यक -डॉ. दत्ताजी मेहत्रे

नांदेड:( दि. ७ ऑगस्ट २०२६)
माणसाच्या प्रत्येक घडामोडीवर राज्य नियंत्रण ठेवते. राजकारणात इंटरेस्ट नाही; असे म्हणणारी व्यक्ती अव्यवहारिक आहे. डोळस व सक्षम नागरिक होण्यासाठी राज्यशास्त्र आवश्यक आहे. जीवन जगण्याचे आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे ज्ञान राज्यशास्त्र देते, असे प्रतिपादन नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. दत्ताजी मेहत्रे यांनी केले.
यशवंत महाविद्यालयात राज्यशास्त्र सत्रारंभ सोहळ्यात ‘राज्यशास्त्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी विचारमंचावर माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अजय गव्हाणे, डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. विरभद्र स्वामी, डॉ. विश्वाधार देशमुख यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, मानवीय आणि सामाजिक मूल्य ज्ञात होण्यासाठी राज्यशास्त्र आवश्यक आहे. सामाजिक मूल्यांचा आणि कायद्याचा उपयोग करून आपण समाजाला काय देऊ शकतो, याचा विचार प्रत्येक नागरिकाने करावा. पुस्तकातील आणि मस्तकातील ज्ञानामध्ये फरक असतो. ज्ञान केवळ पुस्तकी राहू नये, अशी भावना देखील व्यक्त केली.
प्रारंभी कु.आदिती अनलदास यांनी भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. सूत्रसंचालन कु.मोहिनी लिंगायत यांनी केले. प्रमुख अतिथींच्या परिचय कु.वैष्णवी गोरे यांनी करून दिला. शेवटी आभार कु.समीक्षा वाघमारे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश तारू, अर्जुन देशमुख, राजशेखर गादेवार, रामेश्वर शिंदे, डॉ. अजय मुठे, डॉ.डी.डी.भोसले, डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड, डॉ. प्रवीणकुमार सेलूकर, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे यांनी सहकार्य केले.

Share

Related posts

माय मराठीचा समृद्ध वारसा जपण्यासाठी ज्ञानवन प्री स्कूलची स्थापना

Chief Editor

अर्थशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय शेतकरी दिन निमित्त भितीपत्रकाचे प्रकाशन

Chief Editor

विज्ञान आणि आरोग्य यांच्या समन्वयामुळे समाज सुदृढ बनू शकतो – डॉ. नितीन जोशी यांचे प्रतिपादन

Chief Editor

दिव्यांगाच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी नांदेड यांनी वेळोवेळी बैठकितील प्रोसिडींगमधील प्रश्नांची सोडवणुक व वरीष्ठाच्या आदेशाची पंधरा दिवसांत अंमलबजावणी नाहि झाल्यास हदगाव तहसिलदार साहेब यांच्या दालनात स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत आंदोलनाचा निवेदनाद्वारे दिला ईशारा

Chief Editor

ऊध्दव हरकाळ यांचा अल्काताई सोळंके, सोरेकर यांच्या हस्ते सत्कार.

Chief Editor

संत शिरोमणी गोरोबा काकांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये २ ऑगस्टला भव्य शोभायात्रा विद्यार्थी गुणगौरव आणि समाजभूषण सत्कार सोहळा

Chief Editor

Leave a Comment