परभणी: दि१ऑगस्ट शनिवार २०२६
कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी येथे 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
प्रत्येक नागरिकाने भारतीय राज्यघटनेने व मानवीय दृष्टिकोनातून घालून दिलेले आदर्श व कर्तव्य याची जाणीव ठेवत व्यवहार ठेवला तर भारताच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशकता येईल. यामुळेच टिळकांना अभिप्रेत असलेले स्वराज्य भारतात अवतरेल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ रामचंद्र भिसे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बी. ए. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी कु. शेख फातिमा यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनचरित्राची माहिती दिली, तर मराठी विभागातील डॉ. आशा गिरी लिखित अण्णाभाऊ कविता सादर करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन डॉ.महेश जाधव व आभार डॉ संगीता लोमटे यांनी मानले.
