तरुणांनी गुणांत्मक मतदान करुन लोकशाहीचे रक्षण करावे.: प्रा डॉ. पंडित मोरे*
मानवत / प्रतिनिधी.
येथील के के एम महाविद्यालयात आज दि.04/04/24 रोजी ” *लोकशाहीच संवर्धन काळाची गरज “* या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. या प्रसंगी प्राध्यापक डॉ. पंडीत मोरे बोलतांना म्हणाले की दीडशे वर्षाच्या संघर्षा नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. या दीडशे वर्षात हजारो तरुण फासावर गेलेत, अनेकांनी आपल्या सुख दुःखाचा विचार न करता आपले संपूर्ण आयुष्य मातृभूमीच्या मुक्ती साठी खर्ची घातले.
तर असंख्य महिलांनी अन्याय अत्याचार सहन केला, महिलांची अब्रू लुटली गेली. हजारो समाज सुधारक, हजारो क्रांतिकार यांनी देश सेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. अशा रोमहर्ष संघर्षातून भारत गुलामगिरीतून मुक्त झाला. मात्र आपण स्वातंत्र्याच्या 75 वर्षात ही स्वातंत्र्याचे मोल जपण्यास आपण कमी पडत आहोत.या स्वातंत्र्याच्या 75 वर्षात भारतीय नागरीकांनी हक्कच सर्वस्व मानले कर्तव्य पालनात कुचराई केली. कर्तव्य विसरून गेलेत याचा परिणाम लोकशाहीचा ऱ्हास होत गेला.
याला आपण सर्व जण जबाबदार आहोत.मूलभूत कर्तव्याच पालन न करणे,राज्यघटनेच पालन न करणे, कायद्याचा अनादर करणे, जात, धर्म, पैसा पाहून मतदान करणे, राष्ट्राप्रती डळमळीत निष्ठा, देशाप्रती, समाजाप्रती प्रामाणिक न राहणे इत्यादी गोष्टींमुळे लोकशाहीचे अवमुल्यण होत आहे. लोकशाही वाचवायची असेल तर सद्या तुमच्या बहुसंख्याख मतदानाचा उपयोग नाही तर गुणात्मक मतदान करवून लोकशाहीच रक्षण करा असे आवाहन प्राध्यापक डॉ पंडीत मोरे यांनी मतदारांना केले.या प्रसंगी डॉ के एस कदम, डॉ योगेश बागुल, डॉ राठी एस आर, प्रा सूर्यवंशी एस एम आणि महाविद्यालयातील बहुसंख्य विध्यार्थी या वेळी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ योगेश बागुल तर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरासह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आभार प्रा. डॉ. एस. आर. राठी यांनी मानले
***