शेतकर्यांच्या मोटार पंपातील तांब्याची तार चोरणार्या भूरट्या चोरांच्या मूसक्या आवळा शहरप्रमूख अनिल जाधव
मानवत / प्रतिनिधी.
*ग्रामीण भागात अज्ञात भूरट्या चोरांचा सूळसूळाट झाला असून ;* त्यामूळे तालूक्यातील शेतकरी भयभित झाला आहे. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या विद्युत मोटारी तील तांब्यांच्या तारांची चोरी करणाऱ्या चोरांचा बंदोबस्त करा – *शिवसेनेचे शहर प्रमुख अनिल जाधव यांची पोलिस प्रशासनाकडे मागणी*
मानवत तालुक्यातील किन्होळा या गावात दिनांक 17-3-24 रविवार मध्यरात्री गावातील 13 शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारतील तांब्याच्या तारांची चोरी झाली.चोरी झालेल्या ते शेतकरी
*(१) अच्युत योगीराज रासवे,(०२) छत्रगुण मारोतराव कदम, (०३) संजय ज्ञानोबा कदम, (०४ ) अश्रोबा नागोराव कदम, (०५ ) लिंबाजी जिजा कदम,( ०६ ) लिंबाजी दादाराव सोळंके, ( ०७ ) नवनाथ मच्छिंद्र सुदाम, ( ०८ ) सुंदर एकनाथ जाधव, ( ०९ ) नरहरी सुंदरराव कदम, ( १० ) विष्णू शामराव कदम, ( ११ ) शिवाजी संतोबा कदम, ( १२ ) मारुती दगडोबा तूपसमुंद्रे, ( १३ ) छगन किशनराव कदम* , या सर्व तेरा शेतकऱ्यांच्या शेतातील 7.5 एच.पी व 5 एच.पी कॅनाल वरील पाण्याच्या विद्युत मोटारीच्या आतील तांब्याच्या तारा अज्ञात चोरांनी चोरी केलेलीआहे. चोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी तसेच त्यांना प्रतिबंधित करण्यात यावे. असे निवेदन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतिने मानवत पो. स्टे चे पोलिस निरिक्षक दीपक दंतूलवार यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर शिव सेनेचे तालुका प्रमुख माणिकराव काळे पाटील , शिवसेना शहर प्रमुख अनिल जाधव , उपशहर प्रमूख आप्पा भिसे व शिवाजी सोरेकर , शेख खुद्दूस , शाम शेवाळे , आकाश चव्हाण , शेख अझर पोलीस पाटील , यांच्या सह तार चोरी गेलेल्या सर्व भयभित शेतकर्यांच्या सह्या आहेत.
..
🚩🚩🚩🚩🚩