सावंगी मगर येथे सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त विजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी <
मानवत / प्रतिनिधी.
दर वर्षी प्रमाणे या वर्षी मानवत तालुक्यातील मौ. सावंगी मगर येथे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून ०३ मार्च ते ११ मार्च पर्यंत सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व भव्य यात्रा महोत्सव निमित्त गावात विद्युत पुरवठा सुरळीत सकाळी ५ ते ०९ या वेळेत भार नियमन (लोडशेडींग ) बंद करुन विदयुत पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वतीने सहाय्यक अभियंता यांच्या कडे करण्यात आली आहे निवेदनावर सर्कल प्रमुख माऊली मुळे, तालुकाध्यक्ष माऊली दहे, शहराध्यक्ष संतोष कुऱ्हाडे, रामा बारहाते, जिल्हा ध्यक्ष महादेव काकडे, उपशहरा ध्यक्ष आकाश ढगे, उपाध्यक्ष आदित्य आवचार, ज्ञानेश्वर मुळे, पाडुरंग मुळे, राधाकिशन करे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
***