देवलगाव आवचार गावात राजकीय नेत्यांना , पूढार्यांना प्रवेश बंदी* > सकल मराठा समाज बांधवांनी घेतला एकमताने ठराव <
मानवत/प्रतिनिधी.
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा लढा उभारला गेला असल्याने त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी मानवत तालुक्यातील मौ. देवलगाव आवचार येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत गावात राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांना प्रवेश बंदीचा सर्वानुमते ठराव घेण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की,
मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र झाला असल्याने मानवत तालुक्यातील देवलगाव आवचार गावात मधुकर आवचार यांनी सुचविल्या प्रमाणे आणि नारायण आवचार यांच्या अनुमोदना नुसार गावातील सर्व सकल मराठा समाजाने एकमताने ठराव घेऊन राजकीय नेते तसेच लोकप्रतिनिधी यांना गाव प्रवेश बंदी करण्यात आले आहे. ठराव सहमत झाल्या नंतर सकल मराठा समाजाच्या वतीने मानवत तहसीलचे तहसीलदार रणजितसिंग कोळेकर यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे की मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेते, लोक प्रतिनिधी यांनी गावात प्रवेश करू नये. तसेच राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांच्यासाठी गाव प्रवेश बंदीचे फलक गावाबाहेर लावण्यात येणार आहे.
तेव्हा काही अनुचित प्रकार झाल्यास याची सर्वस्व जबाबदारी शासनावर राहील असे निवेदनात म्हटले आहे. दिलेल्या निवेदनावर देवलगाव अवचार ग्राम पंचायतीचे सरपंच केशवराव आवचार, रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मधुकर आवचार, नारायण आवचार, उपसरपंच शुभम आवचार, तुकाराम आवचार, मोहन आवचार, बालाजी दिवटे, मारोती आवचार, सतिश आवचार, भारत आवचार, कैलास आवचार, शिवाजी आवचार, पंढरीनाथ आवचार, अंगद आवचार , शेषराव आवचार, बाबा आवचार, गोपाळ आवचार, माऊली आवचार, बाळु मेटे, विठ्ठल सुदाम, परमेश्वर सुदाम, रमेश आवचार, उध्दव आवचार, एकनाथ आवचार यांच्या सह सकल मराठा समाज बांधवांच्या मोठ्या प्रमाणात स्वाक्षऱ्या आहेत.
***