https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हाजार रूपये अनुदानसह पीकविमा द्या.* > स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी ; बुधवारी जल समाधी आंदोलन करण्याचा इशारा

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यात २५ दिवसापासून पावसाचा खंड पडला आहे त्यामुळे शेतातील पिके सुकली असून याचे तात्काळ पंच नामे करण्यात यावेत अशी मागणी अगोदर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वतीने प्रसानाकडे करण्यात आली होती परंतु प्रसासनाने अद्याप कसली ठोस पावले उचलली नसल्याने शेतातील सोयाबीन, कापूस, ही पिके पाण्याअभावी करपत आहेत. याकडे मात्र प्रसासनाने व विमा कंपनीने दुर्लक्ष केले असून सदरील प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना शासकीय अनुदान हेक्टरी ७५ हजार रुपये व पिक विमा द्यावा या शेतकरी हिताचा मागणी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वतीने २३ ऑगस्ट बुधवार रोजी रामपुरी येथील गोदावरी नदी पात्रात जल समाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला असून निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल चौकट, नामदेव काळे, शिवाजी चोखट, श्रीकांत डासाळकर सुरज चौकट, संजय चौकट, तुकाराम मसलकर, विठ्ठल कदम, गोपाळराव काळे, अशोकराव काळे, महादेव काळे प्रकाश काळे, गणेश काळे, दत्ता काळे, कृष्णा कदम, नारायण रोडगे, राम देशमाने, अमोल साखरे यांच्या सह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704