नांदेड:
आज JEE,NEET, व तत्सम परीक्षेच्या माध्यमातून डॉक्टर इंजिनियर होऊन मोठे पॅकेजचे स्वप्न पाहणाऱ्या काळात एक ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा देशसेवेचे स्वप्न पाहतो आणि भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट होऊन ते प्रत्यक्षात उतरवतो. भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचे अत्यल्प प्रमाण आहे. अशा या वेगळ्या वाटेचा वाटसरू म्हणजे लेफ्टनंट तुषार.हे उदाहरण आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील बेलखेड या छोट्याशा गावातील कु. तुषार भीमराव फटिंग यांचे.ग्रामीण भागात शालेय शिक्षण पूर्ण करून आपल्या जिद्दीच्या व मेहनतीच्या जोरावर TCS सारख्या नामांकित कंपनीमध्ये जॉब करत करत(UPSC) यूपीएससी परीक्षा आणि एसएसबी (SSB) च्या मुलाखतीद्वारे इंडियन आर्मी मध्ये लेफ्टनंट हे पद संपादन केले आहे. त्याचे हे यश म्हणजे ग्रामीण भागातील तरुणाची गरुड झेप आहे .ग्रामीण भागातील तरुणांसाठी ‘गरुड’ हे जिद्द, चिकाटी आणि प्रतिकूल परिस्थितीत उंच झेप घेण्याचे प्रतीक आहे. गरुडाप्रमाणे वादळातही न डगमगता संघर्ष करणे, स्वतःचे भक्ष्य स्वतः मिळवणे आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून प्रगती करणे, हे आजच्या तरुणांना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
