https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

आज पासून श्री विठ्ठल मंदीराच्या सभागृहात प्रस्थानत्रयी ज्ञानयज्ञाचे आयोजन* *(( पंचकोशितील भाविक भक्तांनी ज्ञान यज्ञाचा लाभ घ्यावा स्वामी महेशानंदजी पूरी महाराज यांनी केले आवाहन

मानवत // प्रतिनिधी.

स्वामी दिव्यानंदजी पुरी महाराज यांच्या जयंती निमित्त मंगळवार दिनांक १९ मार्च पासून शहरातील श्री विठ्ठल मंदिर संस्थानच्या सभागृहात *प्रस्थानत्रयी ज्ञानयज्ञा* चे आयोजन जिंतूर येथील स्वामी दिव्यानंदजी सत्संग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे .
मानवत शहरातील श्री, विठ्ठल मंदीराच्या सभागृहा मध्ये मंगळवार दिनांक १९ मार्च पासून शनिवार ता ३० पर्यंत सकाळी ७ ते ९ व दुपारी ३ ते ५ यावेळेत धार्मिक ग्रंथावर विविध महाराजांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे .
मंगळवार ता १९ ते बुधवार ता २७ महामंडलेश्वर स्वामी मनिषानंदजी पुरी , विश्वेश्वरजी चैतन्य महाराज आळंदी , ज्ञानचैतन्यजी महाराज काशी , राघव चैतन्यजी महाराज काशी यांचे श्रीमद भगवतगीता ब्रह्मसूत्र , उपनिषद यावर प्रवचन होणार आहेत .
तर गुरुवार ता २८ ते शनिवार ता ३० महामंडलेश्वर स्वामी विश्वात्मानंदजी पुरी हरिद्वार , भारती चैतन्य महाराज , स्वामी रसानंदजी पुरी महाराज , स्वामी हरिशानंदजी पुरी महाराज टाकळगव्हाण , स्वामी हरिचैतन्यानंदजी सरस्वती पळसखेड यांचे *प्रस्थानत्रयी* , गुरुदेव व साधु चरित्र कथा या विषयावर प्रवचन होणार आहेत . रविवारी ता ३१ सकाळी १० वाजता स्वामी हरिषानंदजी पुरी महाराज यांचे काल्याचे किर्तन त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून मानवत तालूक्यातील पंचकोशितील भाविक भक्तांनी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक जिंतूर येथील चैत्यन्योदय गुरुकुल आश्रमाचे संस्थापक स्वामी महेशानंदजी पुरी महाराज यांनी केले आहे .

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704