महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलनात प्रसिद्ध कवयित्री लैलेशा भुरे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव
नागपूर:(डॉक्टर प्रवीणकुमार सेलूकर)रामटेक येथील अखिल भारतीय साहित्य परिषद पुणे विदर्भ द्वारा आयोजित रामटेक येथील सोळाव्या अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध कवयित्री लैलेशा भुरे यांना त्यांच्या कार्याची दखल घेत सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सोळावे अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन रामटेक येथे स्वर्गीय घनश्यामराव किंमतकर सभागृह आझाद वार्ड येथे संपन्न झाले,
या संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र पोतदार तर उद्घाटक म्हणून कृपालजी तुमाने खासदार रामटेक तर स्वागताध्यक्ष डॉक्टर ललिताजी चंद्रात्रे अधिष्ठाता कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आदी मान्यवरांची उपस्थिती होती. हे संमेलन पाच सत्रामध्ये आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात अनेक मान्यवर कवी व कवयित्री.सहभागी कवी
मो.अ.रहीम (चंद्रपूर), पुनाजी कोटरंगे (चंद्रपूर), धनश्री मारकर (नागपूर), आबा पांचाळ (बसमत), अंबादास टाकनखार (मालेगाव), मदनराव अंभोरे (सुकळी), शेख अहेमद पिरणसाम (यसमत), कवयित्री विद्या निनाचे (नागपूर), आंद तरोडेकर (परभणी), कवी वामन गुरवे (भंडारा), कवयित्री अर्चना गुरवे (भंडारा), कवयित्री स्वाती सेलोकर (भंडारा) कवयित्री निलिमा लांबकाने (भंडारा), कवयित्री मंगला उहाके (भंडारा), कवयित्री कमल सार्वे (भंडारा), कवयित्री डॉ. नंदिनी खाडे (नागपूर), कवयित्री रेणुका झंझाड (भंडारा), कवयित्री प्रनोती रोडे (घवतमाळ), कवयित्री पायल भुसाटे (यवतमाळ), सतीश सोमकुवर (नागपूर), सुभाष मानवटकर (हिंगणा), कवयित्री मंजुबी कारेमोरे (नागपूर), ओंकार राठोड (दारब्बा), महादेव निमकर (अमरावती), मयूर जोशी जिंतूर (परभणी), प्रशांत जांभुळकर (रामटेक) कवयित्री प्रा. छाया बोरकर (गोंदिया), हरिदास गौतम कामठी (नागपूर), कवयित्री ज्योलना दोंदलकर (नागपूर), कवयित्री सुनंदा अंबोरे (छत्रपती संभाजी नगर), देवेंद्र निकूरे (नागभीड), वाल्मीक मेश्राम (गोंदिया), परमानंद तिराणीक आनंदवन (वरोरा), कवयित्री विद्या ठवकर (भंडारा), निखत कलाम पठाण (रामटेक), नितेश खरोप्ले (गोंदिया), निलेश तुरके (यवतमाळ), नरेंद्र गंधारे (हिंगनघाट) यादव मावळे (भोपाल), कवयित्री वसुधा चेनका (नागपूर) कवयित्री वेदशी बारोकार (रामटेक), कमवित्री उज्वला कुंभार (सातारा), कवयित्री वैशाली राऊत (नागपूर), कवयित्री वर्षा नाथस्कर (नागपूर), कवयित्री लैलेशा भुरे (नागपूर), कसनदास जामय दारच्छा (यवतमाळ), कवयित्री प्रतिभा प्रमणाचे (रामटेक), लीलाबर ठाकरे (नागपूर), संजय शिवनकर (चंद्रपूर)
यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा कवी राकेश जी खलासने यांनी केले.