निरोगी जीवन, निरोगी खाणे’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
नांदेड:( दि. १६ डिसेंबर २०२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात एनसीसीच्या वतीने दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष विशेष मोहीम (IYOM) निमित्त आपल्या दैनंदिन जीवनात मिलेटचे आरोग्यासाठी महत्त्व समजण्यासाठी “निरोगी जीवन निरोगी खाणे”या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे या होत्या तर प्रमुख वक्ते प्रा. एन.डी.राठोड यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर हे वर्ष साजरे करण्यामागे भारताची असलेली महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली तसेच बाजरी पिकांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षिय समारोपात उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी, आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे स्पष्ट करून आजच्या तरुण पिढीने पौष्टिक अन्नपदार्थ खावेत, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार एनसीसीचे संचालक प्रा.श्रीकांत सोमठाणकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, एनसीसीचे माजी संचालक लेफ्टनंट डॉ. रामराज गावंडे तसेच
एनसीसी कॅडेट सार्थक शिंदे,धनजे श्रीनाथ आणि शंकर वहिंदे आदींनी परिश्रम घेतले.
—–