ताज्या घडामोडी

भारतीय जनता पार्टीला *रामराम* ठोकून भा.ज.पा. चे *विश्वनाथ लाडाने (तात्या ) बी.आर.एस. मध्ये दाखल

मानवत / प्रतिनिधी

अब की बार किसान सरकार’चा नारा देत भारत राष्ट्र समिती या आपल्या पक्षाचा देशभर विस्तार करण्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पूर्वीच केली आहे.
राज्यातील निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला त्याच अनुषंगाने राव यांनी महाराष्ट्रात प्रत्येक विधान सभा मतदार संघात समन्वयक नेमून त्या त्या भागातील पक्षाच्या पदाधिकारी यांचा प्रवेश करवून घेतला जात आहे. नूकताच भाजपचे मानवत तालुका अध्यक्ष विश्वनाथ लाडाने यांनी बी आर एस मध्ये प्रवेश केल्याने याचा प्रत्यय आला.
मानवत तालुक्याचे सध्याचे तालुका अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ लाडाने यांनी सत्तेत असताना देखील अचानकपणे असा भारत राष्ट्र समिती या पक्षात जाण्याचा निर्णय घेणे म्हणजे तालुक्यात भाजपा सध्या बॅक फुटवर आहे की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
कारण विश्वनाथ लाडाने हे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून भाजपाचे सक्रिय सदस्य आहे गेल्या तीन वर्षापासून त्यांच्याकडे मानवत तालुका अध्यक्ष पदाची धुरा योग्य पध्दतीने व सक्षम पध्दतीने सांभाळत आहे त्यांच्या तालुकाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी भाजपाला बऱ्याच प्रमाणात तालुक्यात रुजवण्याचे काम केले आहे असे असताना त्यांनी भारत राष्ट्र समिती या पक्षामध्ये प्रवेश का केला याचे आत्मचिंतन करण्याची वेळ भाजप पदाधिकाऱ्यांवर आली आहे असे बोलले जात आहे. भाजपा मानवत तालुका अध्यक्ष विश्वनाथराव लाडाणे यांचा भारत राष्ट्र समिती मध्ये चे प्रदेश अध्यक्ष माणिकराव कदम यांच्या हस्ते प्रा.प्रकशराव भोसले विटेकर यांच्या नेत्रुत्वात पाथरी विधानसभा समन्वयक- बालासाहेब आळणे पाटील यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश करण्यात आला .

बीआरएसने आपल्या विस्ताराची सुरुवात नांदेड जिल्ह्यापासून केली असून मागील चार महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी नांदेड आणि लोहा येथे दोन जाहीर सभा घेतल्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबीर नांदेडमध्ये घेण्यात आले. या शिबिराला महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघापैकी २७८ मतदारसंघातले प्रतिनिधी हजर होते, अशी माहिती या पक्षात महत्त्वाची जबाबदारी भारत राष्ट्र किसान समिती चे प्रदेश अध्यक्ष माणिकराव कदम यांनी दिली .

तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या आधी इतर कोणत्याही म्हणजे मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या राज्यांतील विधानसभा निवडणूक हा पक्ष लढविणार नाही, असे माणिकराव कदम यांनी स्पष्ट केले. नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत राव यांच्या पक्षाने सहभाग घेतला नाही. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे या पक्षाने आधीच जाहीर केले होते, पण या निवडणुकांबाबतची अनिश्चितता अद्याप कायम असल्यामुळे भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात आता पक्षविस्ताराचा कार्यक्रम आखला असून यासंदर्भात मार्गदर्शक सूचना आणि इतर माहिती नांदेडच्या शिबिरामध्ये पक्षातर्फे देण्यात आली असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले .

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.