नांदेड:( दि. २२ ऑगस्ट २०२६)
यशवंत महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाचा इंडक्शन प्रोग्राम उत्साहात संपन्न झाला. सोहळ्याचे प्रमुख वक्ते श्री.दत्त महाविद्यालय, हदगाव येथील समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. पी. ढोले होते. अध्यक्षपद माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी भूषविले.
कार्यक्रम समाजशास्त्र विषय, त्याचे स्वरूप, समाजशास्त्राचे प्रत्येक समाजासाठी योगदान तसेच विद्यार्थ्यांच्या करिअरच्या अनुषंगाने व संशोधनाच्या बाबतीत या ज्ञानशाखेची भूमिका या अनुषंगाने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवशंकर रत्नपारखे यांनी केले तर आभार प्रा.शंकर मार्कड यांनी मानले. समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. भरत कांबळे, डॉ. बालाजी भोसले, प्रा. पूजा मिरगेवार आणि प्रा. भगत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, अनेक सामाजिक अपप्रवृत्ती, विघटनकारी समस्या आणि संघटनांमध्ये निर्माण झालेली विघटनात्मक स्थिती या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. एस. पी. ढोले यांनी, समाजशास्त्राचे मानवी सामाजिक जीवनातील महत्त्व आणि समाजाची पुनर्रचना, समाजशास्त्राने दिलेले योगदान त्याचप्रमाणे समाजशास्त्रातील नोकरीच्या विविध संधी या बाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील जगन्नाथ महामुने, नाना शिंदे यांनी सहकार्य केले.
