भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी मूल्यासाठी 9 ऑगस्ट रोजी यशवंत महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली पंचप्रण शपथ
नांदेड दि. 8 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी मूल्यांना समोर ठेवून “मेरी माटी मेरा देश” अंतर्गत संपूर्ण देशभर एक विशेष मोहिम हाती घेतली आहे. 9 ऑगस्ट क्रांतीदिनापासून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळा सुरू होत असून केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशभर याचे नियोजन केले गेले आहे.
याअंतर्गत 9 ऑगस्ट रोजी यशवंत महाविद्यालय येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची माजी प्रकल ग्रुप तथा यशवंत महाविद्यालयाची प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 10 वा. पंचप्रण शपथ उपप्राचार्य डॉक्टर कविता सोनकांबळे यांच्या समवेत विद्यार्थ्यांनी घेतली
भारतीय स्वातंत्र्याचे मूल्य डोळ्यासमोर ठेवून घेतल्या जाणाऱ्या शपथेचा मजकूर शासनातर्फे निर्गमीत असा होता कि “आम्ही शपथ घेतो की, भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध वारसाचा गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू” अशी शपथ सर्व महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली या कार्यक्रमाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची माजी प्र कुलगुरू तथा यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश चंद्र शिंदे उपप्राचार्य डॉक्टर,कविता सोनकांबळे, डॉक्टर हरिश्चंद्र पतंगे, प्राध्यापक डॉक्टर संदीप पाईकराव डॉक्टर साहू डॉक्टर तेलावर सुनिल जाधव आदींची उपस्थिती होती.