https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

चार भिंतीच्या पलीकडे रणांगण जिंकणाराच खरा तरुण – डॉ.एस.एस.तोळमारे

नांदेड:( दि.९ जानेवारी २०२४)
जीवनाच्या शाळेत शिकणारा तरुण जीवनाशी दोन हात करत असतो. तरुणांनी ज्ञानाचे उपयोजन करावे; तरच तो आयुष्यात यशस्वी होतो. विचार आधी आणि कर्म नंतर करावे. स्वप्न आणि दिशा सारखीच बघावी लागेल. शिस्त असावी लागेल आणि समय पद्धतही जोपासावी लागेल. जोपर्यंत तरुण माझ्यात काय आहे, याचे आत्मचिंतन करणार नाहीत; तोपर्यंत तरुणांचा आणि या समाजाचा विकास होणार नाही. सराव, बदल, परिपूर्णता आणि सादरीकरण ह्या सवयी तरुणांनी करून घेतल्या तरच ते जीवनात यशस्वी होतील. कर्माच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करावे लागेल आणि विचारही बदलावे लागतील तोपर्यंत जीवन बदलणार नाही, असे प्रतिपादन योगानंद स्वामी महाविद्यालय, वसमतचे प्रमुख वक्ते डॉ.एस.एस.तोळमारे यांनी केले.
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास या करीता युवक शिबीर दि.०७ जानेवारी ते १३ जानेवारी या कालावधीत मौजे मरळक, ता.जि. नांदेड. येथे संपन्न होत आहे. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते दि.८ जानेवारी रोजी बोलत होते.
याप्रसंगी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मरळक गावच्या सरपंच श्रीमती श्रीमंताबाई नारायण पोहरे, प्रमुख उद्घाटक श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेबजी शेंदारकर, यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, रासेयो विभाग, स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेडचे संचालक प्रो.डॉ.मल्लिकार्जुन करजगी, तसेच मरळक गावचे उपसरपंच बालाजी नामदेवराव कदम, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती गंगाधरराव धोंडजी कदम,
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.बालाजी भोसले, डॉ.दिगंबर कदम, डॉ.मीरा फड, प्रा.अभिनंदन इंगोले, प्रा.कांचन गायकवाड, डॉ.कैलास इंगोले प्रा.राजरत्न सोनटक्के,प्रा.राजश्री जी.भोपाळे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिराचे उद्घाटन कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ.बालाजी भोसले यांनी तर सूत्रसंचालन डॉ.दिगंबर भोसले यांनी केले. शेवटी आभार प्रा.अभिनंदन इंगोले यांनी मानले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमारानी राव, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समिती समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704