मानवत येथील प्रभाग क्रमांक २ मधील नवी वसाहत रस्ता कामाचा कार्यारंभ
मानवत / प्रतिनिधी.
मानवत नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन ( 2 ) मधील बौद्ध नगर परिसरात नवीन वसाहत निर्माण करण्यात आली आहे. त्या वसाहती मध्ये ये, जा , करण्यासाठी रस्ता नसल्याने पावसाच्या दिवसा मध्ये या भागातील अबाल वृध्द नागरिकांना चिखल तुडवीत आपली घरे गाठावी लागत होती.
या परिसरात कायम व मजबूत असा रस्ता निर्माण व्हावा अशी मागणी या प्रभागातील नागरिकांनी केली होती. प्रभाग दोन मधिल नागरिकांच्या रस्ते मागणीचा विचार करून मानवत नगर परिषदेचे शिल्पकार तथा विकास पूरूष , युवा नेते डॉ. अंकुशरावजी लाड यांनी प्रयत्न करूण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन मधिल
रस्ते विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याने या प्रभागातील रस्ते विकास कामाचे कार्यारंभ दिनांक १४ जानेवारीरोजी विकास पूरूष डाॅ. अकूंशरावजी लाड यांच्या श्रीहस्ते करण्यात आला.
या प्रसंगी प्रभागातील जन समूदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत शहरातील प्रभाग क्रमांक दोन ( २ ) मधील बौद्ध नगर परिसर मधील नविन वसाहातील नागरिकांना रस्ते नसल्याने पावसाळ्यात चिखल तुडवित घर गाठावे लागत होते हे रस्ते करावेत अशी मागणी नागरिकांनी केली होती. रस्त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी डॉ अंकुशरावजी लाड यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. या रस्त्याचे उदघाटन १४ जाने रोजी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत डॉ अंकुशरावजी लाड यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी माजी नगराध्यक्ष गणेश भाऊ कुमावत, माजी नगर सेवक गणेशराव कुऱ्हाडे, कंत्राटदार अभिषेक आळसपुरे, नागनाथ टेहरे, भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष नागनाथ कुऱ्हाडे, अमोल कुऱ्हाडे, पत्रकार सत्यशील धबडगे, राहुल भदर्गे, अभिमान धबडगे, संतोष कुऱ्हाडे, नंदू भाऊ जोंधळे, छगन दादा भदर्गे, पृथ्वीपाल भदर्गे, सखाराम वाव्हळे आदींची या वेळी प्रमूख उपस्थिती होती.
येणाऱ्या काळात परिसरात असलेल्या उर्वरित रस्त्याचा प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासन यावेळी डॉ अंकुशरावजी लाड यांनी उपस्थित नागरिकांना दिले.
यावेळी उद् घाटन पर मार्गदर्शन करताना डॉ. अंकुशरावजी लाड म्हणाले की मानवत शहरात कोणता ही नागरिक ज्या वस्तीत राहतो ती वस्ती नाली व रस्ता या पासून वंचित राहणार नाही यासाठी मी सदैव प्रयत्न शील राहणार आहे.
त्याचाच भाग म्हणून या प्रभाग क्रमांक दोन ( २ ) बौद्ध नगर मध्ये असलेल्या नागरिकांची बऱ्याच दिवसापासूनची मागणी पूर्णत्वाकडे होत आहे.
या परिसरात अजून काही जे रस्ते उर्वरित आहे ते रस्ते देखील येणाऱ्या काळामध्ये लवकरच पूर्ण केले जातील त्यामुळे परिसरातील नागरिकांनी रस्त्या सह या भागाच्या विकासा बाबत निश्चित राहावे असेही आवाहन हि त्यांनी या वेळी केली.
***