https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सालगडी झाला लाख मोलाचा शोधूनही सापडेना. मनधरणी करण्याची शेतकर्‍यावर पाळी.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती नविन वर्ष
गुढी पाडवा जवळ आला असून, या सणापासून शेतकऱ्यांच्या नवीन वर्षाला प्रारंभ होतो. गुढीपाडव्या पासून शेतीचे कामे करण्यासाठी नवीन सालगडी ठेवण्यात येतो.
यंदा मात्र सालगडी लाखमोलाचा झाला असून, शेतकरी शोध घेत असले तरी कुणीही सालगडी म्हणून राहण्यास तयार नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मानवत तालूक्यात ज्यांच्याकडे पंधरा-वीस एकर किंवा त्यापेक्षा जास्त शेती आहे त्यांना घरच्या माणसांवर शेतीचे संपूर्ण काम करणे शक्य होत नसल्याने सालगडी ठेवावा लागतो. तर गुढी पाडवा या सणा पासून सालगडी ठेवण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. या सणाच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलजोडी सह शेती अवजारांची पूजा करून उन्हाळी मशागतीच्या कामाला सुरुवात करण्यात येते. यंदा ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याचा सण साजरा होणार असून, नववर्षारंभाला सालगडी मिळावा यासाठी शेतकऱ्यांकडून शोध घेतला जात आहे.
परंतु, अलीकडच्या काळात सालगडी मिळणे कठीण झाल्याचे युवा शेतकरी राम पंडीतराव दहे यांचे म्हणणे आहे.
मागणी प्रमाणे सालाचे पैसे मोजूनही मनधरणी करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704