ईरळद जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम घेऊन *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्सहात साजरी
मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील ईरळद जिल्हा परिषद शाळेत दिनांक ०३ जानेवारी रोजी विविध उपक्रम घेऊन *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास शालेय व्यवस्थापण समिती उपाध्यक्ष श्री. गंगाधर खरात, शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिगांबर भिसे यांच्या हस्ते विद्येची जननी *सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्या नंतर शाळेतील मुलांचे वाढदिवस साजरे करण्यात आले मुलांनी सावित्रीमाई पासून प्रेरणा घेऊन शालेय ग्रंथालयासाठी पुस्तके भेट दिली व इयत्ता १० वी मधिल विद्यार्थीनी कु. रोहीणी निर्वळ या विद्यार्थीचा वाढ दिवस साजरा करण्यात आला. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव संभाजीराव शिंदे यांचा विद्यार्थ्यांना संदेश पत्रक सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
यावेळी संदेश पत्राचे वाचन श्री. सुरेश कापसे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन भुजंग वैद्य यांनी केले. यावेळी शाळेतील विद्यार्थीनी कु. ओवी गाढवे , कु. संस्कृती सोळंके या विद्यार्थिनीचे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत भाषण प्रभावी झाले .या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. अशोक शिंदे, श्रीमती. छाया पाटील, श्रीमती. शारदा गजमल, श्री. महेश गिरी यांनी पुढाकार घेतला यावेळी कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
***