वाचनातून विद्यार्थ्यांना भावी जीवनात शहाणपण प्राप्त होतो -डॉ.कैलास इंगोले
*
नांदेड:(दि. २० ऑक्टोबर २०२३)
विद्यार्थ्यांनी विद्यार्थी असताना दररोज किमान एक पान तरी वाचन करावे; ज्यामुळे त्यांच्यात शहाणपणा निर्माण होऊन भावी जीवनात यशस्वी नागरिक होण्याची पात्रता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल आणि राष्ट्र विकसित होण्यास मदत होईल;असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील डॉ.कैलास इंगोले यांनी विद्यार्थ्यासमोर केले.
श्री शारदा भवन शिक्षण संस्था संचलित यशवंत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने विद्वत व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले.याप्रसंगी व्याख्याते म्हणून डॉ.कैलास इंगोले यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
नियमित वाचन आणि वाचनाच्या पद्धती त्याचप्रमाणे स्मरणशक्ती आणि केलेले वाचन लक्षात राहणे यासाठीच्या विशेष बाबी याविषयी डॉ. कैलास इंगोले यांनी अमूल्य मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमअधिकारी डॉ.बी.आर.भोसले, डॉ.मीरा फड व डॉ.डी.डी.भोसले, कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमअधिकारी प्रा.अभिनंदन इंगोले, प्रा.गायकवाड, प्रा.हुलसुरे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्रसिद्धीप्रमुख डॉ.अजय गव्हाणे व डॉ.व्ही.जी.स्वामी यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभले.