वन विभागाने खबरदारी घेण्याची गरज* *वानरांनी मांडला गावभर उच्छाद ; ग्रामस्थ त्रस्त
मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालूक्यातील सावळी येथे वानरांनी पुर्ण गावभर उच्छाद मांडला असून यामुळे सावळी येथील अबाल वृध्द ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत तालुक्यातील मौजे. सावळी येथे गेली काही दिवसापासून गावभर वानरांनी उच्छाद मांडला असून यामुळे अबाल वृध्द नागरिक त्रस्त झाले आहेत वानरांची टोळीच्या टोळी पुर्ण गावभर धुडगूस घालत असून यामुळे नागरिकांचा घरावरील टिनपत्रे खराब होत आहेत. तर लहान मुलांना या पासून धोका निर्माण होण्याची शक्यता नारीक व्यक्त करीत आहेत.
तसेच गुरुवारी येथील वृद्ध महिला सरूबाई पुनाजी वाव्हळे या त्यांच्या घरी असता त्यांच्या घरावर वानरांचा टोळीने उडया मारल्यामुळे घरावरील पुर्णच टिनपत्रे कोसळली महिला कामा निमित्त घराच्या बाहेर असल्यामुळे सुदैवाने यात कोणती हि जीवित हानी झाली नाही मात्र टिन पत्राचे नुकसान झाले आहे. वानरांच्या उच्छादामुळे येथील नागरिक त्रस्त झाले असून उपाय योजना कराव्यात अशी मागणी सावळी ग्रामस्थामधून होत आहे.
वन विभागाने खबरदारीचा उपाय करावा अशी मागणी सामान्य नागरिकातून होत आहे.
***