स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान ऊर्जा देणारे -मुख्याधिकारी कोमल सावरे.
मानवत / प्रतिनिधी
भारताचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा भारतातील प्रत्येक नागरिकाला ऊर्जा देणारा ऊर्जा स्त्रोत आहे असे प्रतिपादन मानवत नगर पालिकेच्या मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी ध्वजारोहण प्रसंगी केले.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत तालुक्यात आझादी का अमृत महोत्सव या अंतर्गत मानवत नगर पालिका हद्दीत विविध कार्यक्रम घेण्यात आले त्या मध्ये हर घर तिरंगा , कोनशिला स्थापना , वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात आले होते हर घर तिरंगा अभियान मध्ये सलग तीन दिवस ध्वजारोहण करणे होते त्यात पहिल्या दिवशी ज्येष्ठ सफाई कामगार दादाराव भदर्गे तर दुसरे दिवशी पालिकेचे कार्यालयीन ज्येष्ठ कर्मचारी अरुण देशपांडे यांच्या हस्ते तर
15 ऑगस्ट रोजी मुख्य ध्वजारोहण करून या अभियानाची सांगता करण्यात आली नगर पालिका प्रशासन पालिकेचे मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम साठी सज्ज झाले होते पालिकेचे वर्ग 1 पासून ते सर्व स्तरीय अधिकारी , कर्मचारी व नगर पालिकेचा स्वच्छतेचा कणा असलेले सफाई कामगार यांच्या उपस्थित होते.
या वेळी ध्वजारोहण मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक , माजी सैनिक , माजी नगरसेवक , वकील , पत्रकार , व्यापारी यांचे सह शहरातील नागरीक या वेळी उपस्थित होते .
ध्वजारोहण सोहळा पार पाडण्यासाठी नगर अभियंता सय्यद अनवर, अमोल तांदळे, विनय आडसकर ,
लेखापाल मंगेशसा खोडवे , बळीराम दहे , पंकज पवार , संजय कुऱ्हाडे , संतोष उन्हाळे , आस्थापना विभागाच्या वंदना इंगोले , भगवान शिंदे , एकनाथ जाधव , विठ्ठल पेडगावकर व शेख वासिम , सय्यद जावेद अलीम अन्सारी , सुनील कीर्तने , दीपक भदर्गे , रितेश भदर्गे , भारती भदर्गे , निवृत्ती लाड यांनी पुढाकार घेऊन परिश्रम घेतले.
***