मानवत शहरात वाहनतळ नसल्याने रहदारीला अडथळा.
मानवत / प्रतिनिधी.
*मानवत शहर हे तालूक्याचे ठिकान असून शहरात मोठी बाजार पेठ आहे. त्यामूळे शहरात बॅका मोठ्या प्रमाणात आहे. त्यामूळे शहरात ग्रामिण भागातून नागरिक व्यापार पेठेत खरेदीसाठी येत असतात शहरातील व्यापार पेठेत वाहनतळ नसल्यामूळे शहरात जागोजागी मोटार सायकल व मालवाहतूक वाहनांचा मूक्तसंचार असल्यामूळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून नगर परिषद याकडे लक्ष देण्याची गरज आहे.*
*सविस्तर वृत्त असे की,*
*मानवत शहराशी पंचकोशितील ५४ गावांचा संपर्क असतो तर पाथरी , सेलू, सोनपेठ, या ३ तालूक्यातील नागरिकांचा मानवत शहराशी संपर्क असतो शहरात बॅका, दवाखाने, कापड, स्टिल सेंटर असे नित्योपयोगी दूकाने असल्यामूळे शहरात नेहमीच गर्दी असते शहरामध्ये वाहनतळ नसल्यामूळे शहरात वाहने रस्त्याच्याकडे वर ऊभी करून नागरिक हे आप आपले काम करायला जातात , तासंन तास वाहने शहरातील रस्त्याच्याकडेवर ऊभी राहत असल्यामूळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.*
*तर अनेक वेळा वादावादीचा प्रसंग नेहमीच निर्माण होतो. अवैद्य मालवाहतूक वाहनावर कोणाचे ही नियत्रंन राहिले नाही त्यामूळे अवैद्य वाहनांना प्रवेश बंदी करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. शहरातील रहदारीला अडथळा निर्माण करणार्या वाहनावर कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होत आहे.*
*मानवत नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी शहरातील रहदारीच्या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष देऊन शहरातील पोट भाडेकरूंचा कायमचा प्रश्न निकाली काढून उपाय योजना करावी अशी मागणी नागरीकांतून होत आहे.*
***