एम सी आर
Uncategorized

मांडवीत बालमित्र मेळावा संमेलन उत्साहात; 23 वर्षांनंतर मित्रांची भावनिक भेट

किनवट तालुका प्रतिनिधी –

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मांडवी येथे जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये बालमित्र मेळावा संमेलन उत्साहात पार पडले. तब्बल 23 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांच्या चेहऱ्यावर आनंद आणि भावनिक क्षणांचे चित्र पाहायला मिळाले.

या अनोख्या मेळाव्याचे आयोजन रवींद्र जंगलेवाड, बादल राठोड, लकी राठोड आणि अंकुश राठोड यांनी पुढाकार घेऊन केले. 2003 सालच्या दहावीच्या जुन्या बॅचमधील मित्रांना पुन्हा एकत्र आणण्याचा हेतू या कार्यक्रमामागे होता. अनेक वर्षांनंतर भेट झाल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि वातावरण आनंदमय झाले.

कार्यक्रमादरम्यान दिलीप श्रीनिवार यांनी “आने से उसकी आये बहार” हे गाणे सादर करून उपस्थितांचे मन जिंकले व कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र जंगलेवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन चव्हाण यांनी केले.

मांडवी नगरीत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या बालमित्र मेळाव्याचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत असून, आयोजकांच्या प्रयत्नांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Share

Related posts

पद्मश्री डॉ.स्मिता रवींद्र कोल्हे यांना कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते सोमवार ,९ मार्च रोजी प्रदान केला जाणार.

Chief Editor

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

Chief Editor

हायड्रेट हर्बलाइफ: उन्हाळ्यातील ताजगीसाठी

Chief Editor

ऊध्दव हरकाळ यांचा अल्काताई सोळंके, सोरेकर यांच्या हस्ते सत्कार.

Chief Editor

रुपाली चाकणकर यांच्या हस्ते कमलोत्सवाचे उदघाटन संपन्न.

Chief Editor

_विद्रोही साहित्य संमेलनात प्रख्यात सिने अभिनेते मिलिंद शिंदे यांची मुलाखत ठरली लक्षवेधी

Chief Editor

Leave a Comment