https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास शक्य-ॲड.उदयराव निंबाळकर

नांदेड:(दि.१४ जानेवारी २०२४)
राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, असे मत श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष ॲड.उदयराव निंबाळकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराच्या निरोप समारंभ प्रसंगी व्यक्त केले.
त्यांच्या मते विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षणाबरोबरच नेतृत्व, सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग, सभाधिटपणा, राष्ट्रीयत्वाची भावना जोपासणे, श्रमप्रतिष्ठेचे पालन करून तिची अंमलबजावणी करणे या गुणांची गरज असते. समाजाने राष्ट्राच्या पुढील समस्यांवर चिंतन करून निराकरण करण्यासाठी भरीव कामगिरी करणे आवश्यक असते. थोडक्यात विद्यार्थ्यांच्या मन, मनगट आणि मेंदूचा विकास झाल्याशिवाय सर्वांगीण विकास होत नसतो आणि हे करून देण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना ग्रामीण भागातील निवासी शिबीर करत असते, असे पुढे बोलताना ते म्हणाले.
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास या करीता युवक शिबीर दि.०७ जानेवारी ते १३ जानेवारी या कालावधीत प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मौजे मरळक, ता.जि. नांदेड येथे संपन्न झाले आहे.
शिबिराच्या निरोप समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कोषाध्यक्ष ॲड.उदयराव निंबाळकर होते तर विचार मंचावर उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे,
रासेयो विभागीय समन्वयक प्रा. हनुमंतकर तसेच मरळक गावचे उपसरपंच बालाजी नामदेवराव कदम,
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.बालाजी भोसले, डॉ.मीरा फड, प्रा.अभिनंदन इंगोले, प्रा.कांचन गायकवाड , डॉ.कैलास इंगोले, डॉ. राजरत्न सोनटक्के,प्रा.राजश्री जी.भोपाळे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराचा समारोप सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.
या सोहळ्याचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ.बालाजी भोसले तर सूत्रसंचालन डॉ.दिगंबर भोसले यांनी केले. शेवटी आभार प्रा.अभिनंदन इंगोले यांनी मानले.
समारोप सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704