एन.आर.सी.कायदा विरोधात काढलेल्या मोर्चा प्रकरणी *मुस्लिम तरुणाची निर्दोष मुक्तता
मानवत / प्रतिनिधी.
सकल मुस्लिम समाज मानवत व मानवत तालुक्याच्या वतीने भारत सरकारने एन.आर.सी कायदा लागू केल्याच्या विरोधात दिनांक २९ डिसेंबर २०१९ रोजी मानवत शहरात मर्कज मज्जीद ते महाराणा प्रताप चौक पर्यत मुस्लीम समाज बांधवाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.
त्या मोर्चा प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक स्वामी यांनी मानवत पोलीस स्टेशन येथे मोर्चा काढल्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मानवत पोलीस स्टेशन येथे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यावरून मोहम्मद मुस्ताक, आरेफ मसूद सय्यद, अफसर शेख,शेख जुबेर, सय्यद समीर एजाज खान,विधीतज्ञ लुकमान बागवान ,ईलीयास खान यांच्या वर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
प्रस्तुत प्रकरण प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मानवत येथे चालले सदरील प्रकरण श्री शिलवंत साहेब यांनी दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी सर्व मुस्लिम तरुणांची सबळ पुराव्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली सर्व आरोपी तर्फे प्रसिध्द विधीतज्ञ सुनिल जाधव यांनी काम पाहिले सर्व मुस्लिम तरुणांची निर्दोष मुक्तता झाल्या बाबत सकल मुस्लिम समाज मानवत यांच्या वतीने टिपू सुलतान चौक येथे दि.४ जानेवारी रोजी विधीतज्ञ सुनील जाधव व विधीतज्ञ मोहम्मद लुकमान बागवान यांच्यांसह इतर सर्व निर्दोष सुटलेल्या मुस्लिम तरुणाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगर सेवक नियामत खान ,हाजी रफिक कुरेशी,सय्यद सईद,रशीद बेग,ईलीयास बेलदार गुलाम कुरेशी ,डॉ.रिजवान सर यांच्यां सह मुस्लिम नागरीक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
**