सन्मानपूर्वक जगण्यासाठी आवश्यक परिस्थिती म्हणजे मानवी हक्क – डॉ.लक्ष्मण डोंगरे
नांदेड:(दि.२६ ऑगस्ट २०२३)
सन्मानपूर्वक जगण्यासाठी आवश्यक असणारी परिस्थिती म्हणजे मानवी हक्क होय. माणसामाणसामधील भेदभावामुळे मानवी हक्काचे मोठ्या प्रमाणात हनन होत असते. मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी मानवी हक्क अत्यंत आवश्यक असतात;असे मत हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.लक्ष्मण डोंगरे यांनी व्यक्त केले.
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘एकविसावे शतक आणि मानवी हक्क’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, डॉ.वीरभद्र स्वामी यांची उपस्थिती होती.
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे म्हणाले की, मानवी हक्क हा घटक आधुनिक काळात अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येक विषय आणि अभ्यासक्रमाशी त्याच्या आवर्जून संबंध येत असतो.सध्याच्या काळात समाजासाठी ज्ञान ही संकल्पना प्रत्येकाच्या मनात रुजविणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी गतवर्षी मानवी हक्क हा व्हॅल्यू ॲडेड कोर्स पूर्ण केल्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सिंधू कांबळे यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय कु.प्रज्ञा खंदारे यांनी करून दिला तर आभार कु.स्वाती खिल्लारे यांनी मानले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी समायोचित विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डी.यु.मोरे, जगदीश उमरीकर, नाना शिंदे आदींनी सहकार्य केले. या व्याख्यानास इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, सिडको येथील प्रा.योगेश जोगदंड यांची व बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती होती.—-