रोजगार कौशल्य विकास काळाची गरज… प्राचार्य डॉ. शिवणीकर
नांदेड:
भारताची प्रतिमा तरुणांचा देश अशी आहे. या तरूण मनुष्यबळाला रोजगार कौशल्य विकासाची जोड देऊन भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादकतेमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. युवकांमध्ये रोजगार कौशल्य विकसित करणे त्यांना प्रशिक्षण देने आज काळाची गरज आहे असे प्रतिपादन नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधिर शिवनिकर यांनी व्यक्त केले. इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या १५ दिवशीय रोजगार कौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. जीवन मसुरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी या १५ दिवशीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमा विषयी सविस्तर माहिती सांगून या अभ्यास क्रमाचे महत्त्व विषद केले. प्राचार्य डॉ. सुधिर शिवनिकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समाज माध्यमांचा उपयोग जर चांगल्या पद्धतीने केला तर भविष्य उज्वल होईल तसेच या कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगार भिमुख संधी कशा उपलब्ध होतील याचा आढावा घ्यावा अशा मौलिक सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मराठवाड्यातील विद्यार्थ्याना अशा पद्धतीचे रोजगार कौशल्य प्रशिक्षण मिळाल्यास आपले विद्यार्थी मेट्रो सिटीमध्ये जाणार नाहीत व स्थानिक उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुधिर शीवनिकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कोर्स समन्वयक डॉ. संदिप काळे यांनी केले तर डॉ. एस. जी. कुलकर्णी यांनी आभार मानले. या प्रसंगी डॉ. सुग्रीव फड, डॉ. गीता भोजने, प्रा. अश्विनी खांडेकर यांच्यासह या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.