गायरानधारकांचा विविध मागण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर पायी मोर्चा* > महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचा वतीने मोर्चाचे आयोजन
मानवत / प्रतिनिधी.
परभणी जिल्ह्यातील गायरानधारकांचा विविध मागण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर पायी मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चाचे आयोजन महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन ( लाल बावटा ) च्या वतीने करण्यात आले आहे.
या संदर्भात गायरान धारकांचा विविध मागण्याचे निवेदन विभागीय आयुक्त यांना देण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील गायरान जमीन धारकांच्या जमिनी त्यांच्या नावे करण्यासाठी गायरानधारक सतत आंदोलन करत आहेत.
पात्र असून ही गायरान जमिनी कसणाऱ्याच्या नावे झालेल्या नाहीत यातील अनेक गायरानधारक लढा देऊन मयत झाले आहेत.
परंतु स्थानिक पातळीवरील सबळ पुरावे असून ही स्थानिक अधिकारी वर्ग सहकार्य करण्यास तयार नाहीत याच पार्श्वभूमी वर ०१ फेब्रुवारी पासून हा पायी मोर्चा परभणी, मानवत, सेलू, वरून छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात येणार असून या मध्ये विविध मागण्या करण्यात आल्या आहेत दिनांक १४ एप्रिल १९९० च्या पूर्वी पासून ताब्यात असलेल्या गायरान जमिनी कसणाऱ्या गायरान धारकाच्या नावे कराव्यात, गायरान जमिनीवरील घरासाठी झालेले अतिक्रमण नियमित करून बेघरांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा तसेच परतूर, मुखेड, नांदेड येथील राहते घरे नावचे करून मजुरांना घरकुलाचा लाभ द्यावा.
अशा विविध मागण्या महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा ) च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून निवेदनावर राज्याध्यक्ष कॉ. मारोती खंदारे, राज्य उपाध्यक्ष कॉ. सय्यद रज्जाक, परभणी जिल्हाध्यक्ष कॉ. अशोक बुरखुंडे, जिल्हा सचिव रामकृष्ण शेरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
***