ईटाळी ग्रामस्थांच्या पाणि प्रश्नासाठी *विजेच्या वेळेत बदल करा:सरपंच अकूंश खट्टे.*
मानवत // प्रतिनिधी.
ईटाळी ग्रामपंचायतचे सरपंच अंकुश खट्टे यांची विज वितरण कंपनीचे महावितरण अभियंता यांच्याकडे मागणी केली.
सविस्तर वृत्त असे की,
सध्या उन्हाचा पारा चढत असून तालूक्यात पाणि प्रश्न व विजेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विज वितरण कंपनीने विजेचा वेळेत बदल करण्यात करावा अशी मागणी ईटाळी ग्राम पंचायतचे युवा सरपंच अंकुश खट्टे यांनी महावितरण विज कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांच्याकडे केली एका निवेदना द्बारे केली आहे.
सद्यस्थीतीला १० ते ०६ हा वेळ वीज पूरवठा करण्याचा असल्यामुळे हा वेळ शेतातील कामा काजाचा मुख्य वेळ असल्यामुळे गावा तील बहुतांश महिला मजूरआणि शेतकरी हे या वेळेत शेतात काम करत असतात. या कारणामुळे गावाचा पाणीपुरवठा वितरण करण्यात मोठी अडचण येत आहे. तसेच सद्या उन्हाचा झळा अधिक तीव्र होत असल्यामुळे गावातील लोकांची पाण्यासाठी मोठी तारांबळ उडत आहे त्यामुळे विज वितरण कंपनीने आपली वेळ बदलून सकाळी ०८ ते ०४ हा वेळ केल्यास (थ्री फेज) केल्यास ग्राम स्थांची व्यवस्था होईल व ग्रामस्थांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी
महावितरण कंपनीने विजेचा वेळेत बदल करावा अशी मागणी सरपंच अंकुश खट्टे यांनी केली आहे.
***