सारंगापूर येथे राजकीय पुढारी व नेत्यांना गाव बंदीचा सकल मराठा बांधवांचा निर्णय
मानवत / प्रतिनिधी.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाचा लढा सुरु असून या लढ्यास पाठिंबा म्हणून मानवत तालुक्यातील मौ. सारंगापूर येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने राजकीय पुढारी व नेत्यांना गाव बंदीचा निर्णय घेण्यात आला असून सदरील बाबतचे निवेदन मानवत तहसीलदार यांना सादर करत कळवले आहेत यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होत असून या लढ्यास पाठिंबा म्हणून सारंगापूर येथील सकल मराठा समाज बांधवांनी जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत राजकीय पुढऱ्यांना व नेत्यांना गाव बंदी करण्याचा व निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एक मताने निर्णय घेण्यात आला या संदर्भात गावात बंदी बॅनर लावण्यात येणार असून अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित पुढारी व नेत्यांला जबाबदार धरण्यात येईल असा ठराव एकमताने सारंगापूर येथील सकल मराठा बांधवांनी घेतला आहे.
***