भविष्याची जबाबदारी स्वतःवरच घ्या -जिल्हाधिकारी दीपा विश्वास मुंडे.
*
मानवत // प्रतिनिधी.
आजच्या स्पर्धेच्या युगात युवकांसमोर असलेल्या आव्हानांचा आवाका मोठा आहे. या आव्हांनाना सामोरे जाण्यासाठी त्यांना स्वतः ला चांगल्या प्रकारे तयार करावे लागणार आहे.
म्हणूनच इतरांवर विसंबून न राहता वर्तमान तसेच भविष्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवरच घ्यावी असे आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी मा. दीपा मुंडे यांनी या वेळी मार्गदर्शन करतांनी केले.
येथील के के एम महाविद्यालयात आयोजित कै. सेठ रतनलाल काबरा, कै. कोंडाबाई कचरूसेठ कटारिया व अन्य पारितोषिक वितरण सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, इच्छाशक्ती ही यशाची खरी गुरुकिल्ली आहे. सातत्य राखत पुढे जाणे खूपच गरजेचे आहे. अनेक सुविधा असणारे हे महाविद्यालय तुमच्या कारकीर्दीत महत्वाची भूमिका बजावू शकते. म्हणून या सुविधांचा अधिकाधिक लाभ घेतला गेला पाहिजे असे सांगत सकारात्मकता, समाधान यांचे महत्व अधोरेखित केले.
या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे यांनी केले.त्यांनी सदरील कार्यक्रमाचे महत्व विषद करत महाविद्यालयाचा त्रोटक परिचय करुन दिला. या प्रसंगी पाथरी तालूका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. बालकिशनजी चांडक यांनी आपले विचार व्यक्त केले.
तर या वेळी पाहुण्यांचा परिचय डॉ. दुर्गेश रवंदे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ शारदा राऊत यांनी केले. पारितोषिकांचे वाचन प्रा. संजय सूर्यवंशी, प्रा. विनोद हिबारे यांनी केले. अध्यक्षीय समारोप मा. विजय कुमारजी कत्रुवार यांनी केला तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. अनिल कापसे यांनी मानले. कार्यक्रमास कोषाध्यक्ष मा.रामचंद्ररावजी कत्रुवार, मा. दिलिपजी हिबारे, मा. विजयकुमारजी दलाल,उपप्राचार्य डॉ किशोर हुगे, डॉ. बी एस. गीते यांच्यासह प्राध्यापक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपास्थित होते या वेळी शंभरपेक्षा अधिक पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
***