https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत तालुक्या मध्ये एकेवीस दिवसाचा पावसाचा खंड पडल्यामुळे त्याचा सर्व्हे करुन पंचनामे करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्या मध्ये गेली एकेवीस दिवसा पासून पावसाने दडी मारल्या मुळे शेती पिके करपून जात आहेत याचा तात्काळ सर्व्हे करुन पंचनामे करावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वतीने जिल्हाधिकारी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली असून दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,मानवत तालुक्यात गेली २१ दिवसापासून पावसाने दडी मारली असून मोठा खंड पडला आहे त्यामुळे शेती पिके करपली असून शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये नैराश्य निर्माण होऊन शेतकऱ्याना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे तरी या बाबत तात्काळ सर्व्हे करुन पंचनामे करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेष भैया देशमुख, माजी. जिल्हाध्यक्ष सोनु भैया लाहोटी, गोविंद घांडगे पाटील, तालुकाध्यक्ष माऊली दहे, शहराध्यक्ष संतोष कुऱ्हाडे, जिल्हाउपाध्यक्ष महादेव काकडे, मनसे नेते दत्तराव शिंदे, लक्ष्मण शिंदे, बालाजी पौळ यांच्या सह मनसे पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704