देवलगाव, सावरगाव रस्त्यावरून होणारी अवजड वाहतुक बंद करा.* > रयत क्रांती संघटनेचा अवजड वाहतूकदारांना ईशारा
मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील देवलगाव, आणि सावरगाव रस्त्यावरून होणारी अवजड वाहनाची वाहतूक बंद करा असा ईशारा रयत क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
गेली अनेक दिवसापासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबीत होता रयत क्रांती संघटनेचा सततच्या पाठपुराव्यामूळे या रस्त्याच्या कामाची शासनाकडून दखल घेतली व रस्त्याचे काम सुरु करण्यात आले.
परंतु अनेक दिवसाने झालेल्या रस्त्या वरून अवजड वाहतूक होत असल्याने यामुळे रस्त्याची दयनिय अवस्था होत आहे. ही बाब लक्षात घेता रयत क्रांती संघटनेचा वतीने अवजड वाहतूकदारांना देवलगाव (आ) ग्रामस्थासह रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर आवचार, नारायण आवचार, लोकेश सुदाम, जनार्धन आवचार, राधा किसन आवचार, सतीश आवचार, बालाजी आवचार, रमेश अवचार, उद्धव आवचार, गणेश अवचार, अनुरथ आवचार, रफिक सय्यद, भारत आवचार, यांनी सूचक ईशारा दिला आहे.
**