पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड काळाची गरज – प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे
![](https://mcrnews.in/wp-content/uploads/2024/07/IMG-20240702-WA0026.jpg)
नांदेड (प्रतिनिधी): दिवसेंदिवस वृक्षतोड होत असल्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडले असून निसर्गातील समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि त्याचे संगोपन करणे काळाची गरज आहे.असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे यांनी केले.
यशवंत महाविद्यालय नांदेड येथे
मुक्त विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण घेण्यात आला यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक च्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत महाविद्यालय नांदेड येथील अभ्यास केंद्रात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला .केंद्रप्रमुख तथा प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपप्राचार्या डॉ. कविता सोनकांबळे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील,
केंद्रसंयोजक डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड, केंद्र सहायक भुजंग पूयड ,तांत्रिक सहायक डॉ. संतोष पाटील आदींची उपस्थिती होती.