धमकी देणाऱ्या विरुद्ध कारवाई करा मानवत येथील ब्राह्मण समजाची मागणी
मानवत / प्रतिनिधी.
ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवू अशी जाहीर धमकी देणाऱ्या विरुद्ध शासनाने कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मानवत येथील ब्राह्मण महासभेच्या वतीने करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मानवत येथील ब्राह्मण महासभेच्या वतीने मानवत तहसिलचे तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समाज माध्यमावर एका अज्ञात इसमाने उघडपणे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवून टाकणार असल्याची धमकी दिली आहे. सदर इसमाने 5 पेक्षा अधिक लोकांना गोळा करून झुंडशाहीच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाला संपविण्याचा मानस व हेतू उद्दिष्ठ उघड केला आहे.
त्यामुळे हा सुनियोजित व्यापक कट असल्याचे दिसून येत आहे. या कटा द्वारे ब्राह्मण समाजाचे सामुहिक हत्याकांड होण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक असलेल्या ब्राह्मण समाजाच्या मानवाधिकारांचे हनन होत आहे. तसेच ब्राह्मण समाजा विरुद्ध इतर समाजात वैमनस्य निर्माण करण्याचे कृत्य हेतु पुरस्सरपणे केले आहे. तरी सदर घटनेचा तपास होऊन अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन १९४८ प्रमाणे ब्राह्मण समाजाची सामुहिक हत्या घडवण्याचा कट कारस्थान करण्यामध्ये सहभागी दोषीं विरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून ब्राह्मण समाजाला जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण देण्यात यावे.
तसेच भविष्यात असे प्रकार होऊ नयेत म्हणून सक्षम पावले उचलण्यात यावीत.
*धर्माधिकारी यांच्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा*
परळी वैजनाथ जि.बीड येथे दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजक व स्वागताध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावर गून्हा दाखल करण्यात आला हे अत्यंत दुर्दैवी आहे. संयोजक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावर जाणीवपूर्वक व नाहक दाखल केलेला गुन्हा तात्काळ मागे घ्यावा ही ब्राम्हण समाजाची आग्रही मागणी आहे.
यावेळी सर्व ब्राम्हण समाज बांधवांनी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध केला. यावेळी मानवतचे तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनावर प्रसिध्द विधितज्ञ अँड. अनिरुद्धजी पांडे, श्याम भाऊ झाडगावकर, प्रसादजी जोशी, स्वप्नील गुंडू, चंद्रगुप्त भंडारी, विठ्ठल पेडगावकर, अँड. लक्ष्मीकांतजी पांडे, सुनील दत्त भरड , गणेश गुरु बोरगावकर , अशोकराव मानोलीकर, राजेश अंबेकर, धनंजय गाजरे , संजय भोगावकर, नंदू बोरगावकर, दिलीप पाठक, सत्तू पांडे ,मुकेशजी दलाल, योगेश्वर जोशी, बाळासाहेब कुलकर्णी, विजयकुमारजी दलाल, आनंद भरड, किशोर भरड, शिवाजीराव जोशी, दिलीप भरड, श्याम रणसिंग, राजेश गुंडू, गोविंदराव आचार्य ,गजानन आंबेकर, धनंजय कुलकर्णी, अशोकराव जोशी, हनुमंत कुलकर्णी, अशोक कुलकर्णी, सुहास नाईक ,के. जे. भरड, कृष्णा पेडगावकर, रमेश उन्हाळे, महेश गाजरे, संजय जोशी, नंदू बोरगावकर, दुर्गादास उन्हाळे हे आनंद भरड, गणेश भरड, चिन्मय बोरगावकर, अजय कोकीळ, आशुतोष पांडे, मोहनराव कुलकर्णी, सुनील उन्हाळे, अँड.अरुण खारकर, अविनाश रामपुरीकर, अँड. अमोल जोशी , राहुल दलाल, सागर कुलकर्णी, संतोष कुलकर्णी, आदीसह ब्राम्हण समाज बांधवांच्या दिलेल्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
***