ताज्या घडामोडी
एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला: भारतीय संस्कृती:लैलेशा भुरे
भारतीय संस्कृती
**************************
भारत देशाची परंपरा आणि संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे.कारण भारतीय परंपरेनुसार विविध जाती-धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात.भारतात राहणा-या प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून वेगवेगळ्या धर्माचा प्रसार केला जातो.कोणत्याही देशाची संस्कृती ही जाती आणि समुदायाचा आत्मा आहे.भारता व्यतिरिक्त इतर कोणत्याही देशामध्ये भारताप्रमाणे संस्कृती पाहायला मिळत नाही.कारण काळाच्या ओघात इतर देशांतील संस्कृती आणि सभ्यता ब-याच प्रमाणात नष्ट झाली.परंतु भारत देशाची संस्कृती आणि सभ्यता आजही कायम आहे.
भारतीय संस्कृतीचे पालन करतो.भारतातील प्रत्येक राज्याची भाषा, वेशभूषा, राहणीमान, खाद्यपदार्थ,सण, उत्सव साजरा करण्याच्या पध्दती या देखील वेगवेगळ्या आहेत.भारतात वडिलधाऱ्या लोकांचा आदर करणे आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करणे हा प्रमुख धर्म मानला जातो.गुरूंना येथे मान दिल्या जातो.भारत देशाच्या संस्कृतीचे पालन देवतांनी देखील केले.श्री राम यांनी वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी १४ वर्षे वनवास पूर्ण केला होता.महाभारतातील गुरू द्रोणाचार्यांनी आपला शिष्य एकलव्यला गुरू दक्षिणा म्हणून त्याचा अंगठा मागितला.तेव्हा एकलव्याने हसत हसत हाताचा अंगठा कापून गुरू द्रोणाचार्यांच्या चरणी ठेवला.
भारतीय संस्कृती ही अतिप्राचीन आहे.भारतीय संस्कृतीला स्वतंत्र अशी वेगळी वैशिष्ट्ये आणि परंपरा लाभलेली आहे.प्रकृती म्हणजे निसर्ग,विकृती म्हणजे विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार.भारतीय संस्कृतीने तिच्या इतिहासाने, अद्वितीय भौगोलिक रचनेने, वैविध्यपूर्ण लोकजीवनाने तसेच पुरातन परंपरा जपून आकार घेतला आहे.भारत आपल्या परंपरा आणि संस्कृतीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.त्यामुळे भारत ही समृद्ध परंपरा आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीची भूमी आहे.भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे घटक म्हणजे चांगली मूल्ये, विश्वास,सभ्य संवाद इत्यादी.प्रत्येकाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल होत असला तरी भारतीय लोकांनी आपली मूल्ये आणि परंपरा बदललेल्या नाहीत.अनेक परंपरा आणि संस्कृतींच्या व्यक्तींमधील एकतेच्या भावनेने भारताला एक अद्वितीय राष्ट्र बनवले आहे.भारताच्या संस्कृतीला जगभरात खूप लोकप्रियता मिळाली आहे.
भारतातील लोक सामाजिक संबंध टिकवून ठेवण्यासाठी, त्यांच्या चांगल्या वागणुकीसाठी ओळखले जातात.भारतीय लोक त्यांच्या संस्कृतीबद्दल अत्यंत समर्पित आहेत.भारत ही महान आणि महत्वाच्या महापुरूषांची भूमी आहे.ते आजही आपल्यासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत.भारतीय लोक आधुनिकही आहेत आणि आधुनिक युगानुसार सर्व बदल आणि बदलांचे पालन करतात.भारत हा एक अध्यात्मिक देश आहे जिथे व्यक्ती अध्यात्मावर विश्वास ठेवतात आणि ध्यान,योग यांनाही महत्व देतात.आर्किटेक्चर, खाद्यपदार्थ, वागणूक, नृत्य, फॅशन, संगीत इत्यादी सर्व गोष्टींमध्ये आपण आपल्या देशातील संस्कृती पाहू शकतो.संस्कृती ही अशी पद्धत आहे जी आपण इतरांशी कसे वागतो,आपली मूल्ये, नैतिकता,तत्वे आणि विश्वासांबद्दलची आपली समज दाखवतो.आजच्या तरूण लोकांची संस्कृतीने आजही जुन्या पिढीतील लोकांशी नाळ जोडलेली आहे.तथापि, आधुनिकीकरणामुळे अलीकडच्या काळात समाजात संयुक्त कुटुंबे ब-याच प्रमाणात अस्तित्वात नाहीत.आपल्या देशाची संस्कृती महान आहे आणि आपण आपल्या पाहुण्यांचे आनंदात स्वागत करतो.हेच कारण आहे की आपला देश” अतिथी देवो भव” सारख्या कोटासाठी प्रसिद्ध आहे.
**************************
लैलेशा भुरे
नागपुर