https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

लंम्पि आजाराने जनावरे मृत्युमुखी पडत असून या आजारावर नियंत्रण मिळविण्या साठी उपाय योजना करण्याची मागणी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यात सद्या लंम्पि आजाराने अगदी थैमान घातले असून या आजाराने अनेक शेतकऱ्यांची जनावरे मृत्युमुखी पडत आहेत यावर तात्काळ नियंत्रण आणून उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी मानवत तालुक्यातील टाकळी नि. येथील शेतकऱ्यांनी मानवत तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. टाकळी नि. येथील शेतकरी तातेराव सोपानराव नारळे यांचा बैल ३० ऑगस्ट रोजी लंम्पि डिसीज स्किन आजाराने मृत्युमुखी पडला यामुळे शेतकऱ्याचे एकूण पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे तरी या आजाराचा जास्त फैलाव होऊ नये म्हणून तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात व त्या संबंधित सूचना देण्यात यावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली असून निवेदनावर मयूर निलवर्ण, विठ्ठल निलवर्ण, विठ्ठल नारळे, उद्धव जगताप, तातेराव नारळे यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704